आठवण


आज बहोत दिनो बाद हात मे लिया ये जाम है !!!
कुछ दोस्तों को भेजना एक पयाम है !!!

आठवतं ??? तुम्हला ते, काहीही मतलब नसताना भेटणं...
मनात येइल तोवर, त्या कट्ट्यावर पडीक असणं...
आज मोबाईलने म्हणतात जग छोटं झालयं...
पण आपलं मतलबापूरता सूद्धा भेटणं राहुन गेलयं...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

आठवतं ??? ते,
रेलवेप्लॆटफ़ोर्मवर टवाळक्या करत घालवलेले तासनतास...
भेळेच्यारांगेत उभे राहून तिची लागलेली ती आस...
अतामात्र भेळवाला हि नाही, अन तो वेळही नाही....
काळाने, त्याच्या बरोबर नेले ते सर्वकाही....

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

आठवतं ??? तो,
कॊलेजच्या ग्राऊंडवर खेळण्यात घालवलेला वेळ...
अन तास संपण्याअधी येउन हजेरीचा बसवलेला मेळ...
आठवतं ???
ते घामेजलेले चेहरे घेउन, चार टाळकी असलेल्या वर्गात,
अगदि शेवटच्या बाकावर जाऊन बसणं...
अन म्याडमचं ते खूळ लागल्यागत सगळ्यांकडे पहाणं...
कसं मस्त होतं ते, बेभान होऊन मस्तीतलं जिणं...
परत एकदा जमेल का अपल्याला ति धमाल करणं...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

निदान, एकदा तरी आपण परत भेटूयात...
जमेल तितक्या आठवणींची साठवण करुय़ात...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

4 comments:

  1. mast ahe re , ya mast dostichi ani tyaveli kelelya dhamalich aathvan ya nimitane tu parat karun dilis tya baddle dhanyavad....................
    bhari lihile ahes, tula ani aplya sarvanach tase jeevan parat ekda jagata aaale tar kiti bar hoeil,devachya charani hich prathana ki ase dhamal jeevan prateykala parat ekda milo........

    ReplyDelete
  2. छान :)
    आवडली बरका आम्हास . मनराव :)

    ReplyDelete
  3. mast mast mast :)

    m missing those days ,,, m missing my clg days :( :(

    ReplyDelete